असामान्य ते सर्वमान्य _ Prashant Patankar #jeevanvidya #satgurushriwamanraopai
922 بار بازدید -
2 ماه پیش
-
सद्गुरूंनी १९५२ ते २०१२ असे
सद्गुरूंनी १९५२ ते २०१२ असे ६० वर्षे समाज प्रबोधनाचे कार्य केले. उच्च कोटीचा परमार्थ साधून व उत्तम संसार करून मंत्रालयातील (Retired as Deputy Finance Secretary) उच्चपदस्थ नोकरी सांभाळून अत्यंत निरपेक्षतेने, अव्याहतपणे व खूप कष्ट घेऊन हे समाज प्रबोधनाचे कार्य केले केले. निरपेक्षतेने का? कारण त्यांनी प्रबोधन केले परंतु बिदागी घेतली नाही, ग्रंथ निर्मिती केली पण त्याचे मानधन (Royalty) घेतले नाही व अनुग्रह दिले, पण शिष्यांकडून गुरुदक्षिणा घेतली नाही. त्यांनी निर्मिलेले जीवनविद्येचे तत्त्वज्ञान हे धर्मातीत, वैश्विक व शाश्वत असून गरिबांना वरदान, श्रीमंतांना आधार व विश्वाला उपयुक्त आहे. धर्मातीत का? कारण ते कुठल्याही धर्माशी संबंधित नसून मानवी संस्कृतीशी निगडित आहे, वैश्विक आहे कारण ते अखिल मानव जातीला उपयुक्त आहे. शाश्वत आहे, कारण ते निसर्गनियमांवर अधिष्ठीत आहे. जीवनविद्या विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध, बुद्धिनिष्ठ, अनुभवसिद्ध असून गरिबांना वरदान, श्रीमंतांना आधार व विश्वाला उपयुक्त अशी आहे. मानसशास्त्र (Psychology), परामानसशास्त्र (Parapsychology) व अध्यात्मशास्त्र (Metaphysics) या तिन्हींचा सुरेख संगम या जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानात झालेला आहे. या त्यांच्या तत्त्वज्ञाना अंतर्गत परमेश्वर, धर्म, संस्कृती, नियती, पाप-पुण्य, नशीब, संचित, प्रारब्ध, सुख, यशस्वी जीवन, अवतार, पुनर्जन्म, बर्हिमन, अंर्तमन इत्यादींचे विज्ञाननिष्ठ शास्त्रशुद्ध विश्लेषण करून त्यांच्या त्यांनी व्याख्याही केल्या.
या विभूतीचे, युगपुरुषाचे, सद्गुरूंचे जीवन कसे होते ते आपण पाहणार आहोत........!
सद्गुरु श्री वामनराव पै यांची ग्रंथसंपदा
www.digitalbookstore.in/
कृपया स्वयं सद्गुरु श्री वामनराव पै द्वारा विस्तृत मार्गदर्शन के लिए निम्नलिखित लिंक देखें
• Biography Satguru Shri Wamanrao Pai |...
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
2 ماه پیش
در تاریخ 1403/04/31 منتشر شده
است.
922
بـار بازدید شده